Wednesday 21 June 2017

जलयुक्तच्या पाणी उपश्याकडे गावंडेनी वेधले मुख्यमंत्र्यांचे लक्ष.

Guest Author - Bhagwan Palkar ( Reporter daily Deshonnati Marathi newspaper) 


भोकरदन तालुक्यातील कोळेगाव या छोट्याशा गावातील दादाराव गावंडेनी विचारलेल्या प्रश्नाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे.
दादाराव गावंडे हे गावाच्या बाबतीत संवेदनशील व्यक्तिमत्व. गावाचा विकास व्हावा यासाठी सतत झटत असतात सोशल मिडीयावर सतत कार्यरत असतात. त्यांचा स्वतःचा ब्लॉग असून युट्यूबवर आहेत. मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमासाठी जनतेकडून प्रश्न विचारण्याचे आवाहन करण्यात आले होते. नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमाचा पाणी हा विषय होता. राज्यातून अठरा हजार इमेल प्राप्त झाले होते. गावामध्ये झालेल्या जलयुक्त शिवारमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले होते. विहिरी नाले तुडुंब भरले त्यामुळे कपाशी अठरा क्विंटलवरून पंचवीस तर गहू वीस क्विंटलवरून अठ्ठावीस गेल्याचा अनुभव त्यांनी सांगितला. पाणी मोठ्या प्रमाणात असले तरी उपसा त्याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात होत असल्याने लगेच पाण्याचा तुटवडा निर्माण झाला, यावर शासन काय उपाय योजना करणार असा प्रश्न त्यांनी विचारला होता. यावर मुख्यमंत्र्यांनी चांगला प्रश्न विचारल्याबद्दल त्यांचे अभिनंदनकरून पिक आराखड्याबद्दल व पाणी ताळेबंदाविषयीचा निर्णय शासन दोन तीन वर्षात लागू करणार असल्याचे सांगितले.

  खेडेगावातील युवकाने सोशल मिडीयाचा योग्य वापर करून मुख्यमंत्र्यांचे लक्ष जलयुक्त शिवार योजनेचे काम झाल्यानंतर जमा होणाऱ्या पाण्याच्या जलद उपश्याच्या प्रश्नाकडे वेधल्याने मुंबईच्या वर्तमानपत्रांनी याची दखल आवर्जून घेतली आहे. अनेकांनी फोन करून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.सोशल मिडिया ही केवळ शहरवासीयांची मक्तेदारी नसून ग्रामीण युवकही सकारात्मकतेने आपले प्रश्न मांडून कल्पकता दाखवितात हे त्या निमित्ताने समोर आले आहे, यामुळे दादाराव गावंडे यांचे तालुक्यात कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment