दिनांक १५ सप्टेंबर ते २
ऑक्टोबर स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत आहे यानिमित्त भोकरदन तालुक्यातील
कोळेगाव येथे रिलायन्स फाउंडेशन, जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायतच्या संयुक्त
विद्यमाने स्वच्छता अभियान कार्यक्रम राबविण्यात आला. गावामध्ये स्वच्छता फेरी
काढून विविध भागामध्ये साफसफाई करून तणनाशक फवारणी करण्यात आली. स्वच्छता अभियान
केवळ ठराविक काळासाठी मर्यादित नसून ही सुदृढ जीवन जगण्यासाठी अखंड चालणारी क्रिया
आहे त्यामुळे सर्वांनी आपापला परिसर स्वच्छ ठेवण्याचा कसोसीने प्रयत्न करावा असे
आवाहन रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने सचिन सुसर यांनी केले.
No comments:
Post a Comment