Tuesday 20 December 2016

कोळेगाव येथे फोटो स्टुडीओचे उद्घाटन.


भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे ‘यशवंत डिजिटल फोटो स्टुडीओचे उद्घाटन दिनांक १९ डिसेंबर रोजी करण्यात आले. दिवसेंदिवस रोजच्या व्यवहारामध्ये इंटरनेटचा उपयोग वाढत असल्यामुळे प्रत्येक व्यवहारासाठी इंटरनेट जवळपास आवश्यकच झाले आहे. ऑनलाईन कामे, झेरॉक्स, पासपोर्ट साईझ फोटो आदी छोट्या छोट्या कामांसाठी नागरिकांना बाहेरगावी जाऊन कामे करावी लागतात. नागरिकांची ही गरज ओळखून गावातच नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध व्हावी या हेतूने प्रेरित होऊन येथील तरुण दादाराव गावंडे यांनी ‘यशवंत डिजिटल फोटो स्टुडीओचची सुरुवात केली आहे. सदरील स्टुडीओचे उद्घाटन गावातील ज्येष्ठ नागरिक व मा.सरपंच रामराव पा. गावंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मा. सरपंच पुंडलिकराव गावंडे, सरपंच गजानन गावंडे, उपसरपंच दादाराव गावंडे. सांडू साहेब मा. सरपंच पंडितराव गावंडे, डॉ. ईश्वर वाघ, नंदकिशोर सुसर, रामचंद्र गावंडे, रमेश गावंडे, गणेश सोनवणे, अवचित सोनवणे आदींची उपस्थिती होती.

Friday 9 December 2016

कार्यशाळेचे आयोजन.

दिनांक ११ ते १५ डिसेंबर या कालावधीत फुलंब्रीकर नाट्यगृहात पशुसंवर्धन विभागातर्फे कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन इत्यादी व्यवसायाविषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहेत. ग्रामीण भागामध्ये उद्योग शेती निगडीत उद्योग व्यवसाय करू इच्छीनाऱ्या तरुणांनी याचा अवश्य लाभ घ्यावा. (सदरील माहिती दैनिक देशोन्नती वर्तमान पत्रातील दिनांक १० डिसेंबर २०१६ रोजी प्रकाशित झालेल्या बातमीच्या आधारे दिलेली आहे.)

Wednesday 7 December 2016

कॉम्पुटर हार्डवेअर प्रशिक्षणाचे आयोजन.


आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये संगणक हा माणसाच्या जीवनामधला अत्यंत आवश्यक घटक बनला आहे.त्यामुळे या क्षेत्रामध्ये प्रचंड रोजगाराच्यासंधी निर्माण होत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने बेरोजगारांसाठी मोफत कॉम्पुटर हार्डवेअर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले आहे. बेरोजगार युवकांनी याचा लाभ घ्यावा.

(सूचना-सदरील माहिती ही दिनांक ८ डिसेंबर २०१६ रोजी प्रसिद्द झालेल्या दैनिक दिव्य मराठी या वृत्तपत्रातील बातमीच्या आधारे देलेली आहे.)

Sunday 20 November 2016

औरंगाबाद येथे नोकर भरती मेळावा

देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद येथे दिनांक १ डिसेंबर २०१६ रोजी जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण विभागातर्फे व्यवसाय शिक्षण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांसाठी भारती मेळावा आयोजित केला आहे. सदरील मेळावा हा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय औरंगाबाद, देवगिरी महाविद्यालय, बोर्ड ऑफ अॅप्रेंटीस ट्रेनिंग मुंबई,सीएमआय औरंगाबाद,मसीआ औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला आहे. ग्रामीण भागातील विध्यार्थ्यानी जास्तीत जास्त लाभ घ्यावा.(सदरील माहिती ही दैनिक सांजवार्ता दिनांक २० नोव्हेंबर २०१६ रोजीच्या वृत्तपत्रातील बातमीच्या आधारे देलेली आहे.)

Monday 14 November 2016

शेत मालाला योग्य भाव हवा.


सततचा पडणारा दुष्काळ, अतिवृष्टी यामुळे शेतकरी कायम चिंताग्रस्त असतो पण चालू वर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे शेतकरी वर्गात कमालीचा आनंद व्यक्त होत आहे. निसर्गाने या वर्षी साथ दिल्यामुळे शेतकऱ्यांचा मालाचे उत्पादन वाढणार आहे. कपाशी, मक्का, सोयाबीन, तूर आदी पिके मोठ्या कष्टाने शेतकऱ्याने जोपासले आहे. शासनाने शेतकऱ्याच्या मालास योग्य भाव दिल्यास तेंव्हाच खऱ्या अर्थाने मेहनतीचे चीज होईल असे म्हणता येईल. शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा काणा आहे, कोणताही राजकीय पक्ष असो त्या पक्षाचे नेते निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव वाढवून देऊ अशी आश्वासने देऊन निवडून येतात आणि सत्ता आली की त्यांना त्यांच्या आश्वासनांचा विसर पडतो. शेतकऱ्यांची केवळ अनुदानावर बोळवण न करता शेतीसाठी ठोस उपाय योजना  करून शेतकऱ्यांसाठी विविध योजना अंमलात आणाव्यात त्याचप्रमाणे शासकीय स्तरावर शेतीविषयक विविध चर्चासत्रे, प्रात्याक्षिके, कार्यशाळा असे कार्यक्रम आयोजित करून राबविल्यास सदैव आर्थिक विवंचनेत गुंतत चाललेला शेतकरी खऱ्या अर्थाने उभारी घेऊ शकेल यात शंका नाही. 
( या लेखामध्ये संदर्भासाठी दिनांक १४ नोव्हेंबर २०१६ रोजी प्रकाशित झालेल्या दैनिक सकाळ वृत्तपत्रातील औरंगाबाद टुडे या पुरवणीतील कात्रणाचा उपयोग केला आहे) 

Monday 17 October 2016

सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी सुवर्ण संधी.

जिल्हाउद्योग केंद्र जालना यांच्या मार्फत सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठीसाठी जालना जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नवीन उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी सुधारित बीजभांडवल योजनेतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत. गरजू आणि होतकरू तरुणांनी याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संबधित व्यक्तीकडे बातमी वाचून सखोल चौकशी करावी.

Saturday 8 October 2016

शंकेखोर प्रवृत्तीचे सर्जिकल व्हावे..!

भारतीय लष्कराने केलेली सर्जिकल स्ट्राईक्सची कृती अपरिहार्य आणि अनिवार्य होती पाकिस्तानच्या मुजोरीचा तो एकप्रकारे मुहतोड जवाब होता. याबाबत सध्या भारतामध्ये राजकीय वादळ निर्माण होत आहे, अशा मुद्द्यावर बोलताना राजकीय नेत्यांनी थोडे तारतम्य बाळगायला हवे. राजकीय कंडू शमविण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक बाबत पुरावे मागून लष्करालाच खोटे ठरविणे ही मनोवृत्ती भारतीय लष्कराच्या निष्ठा व विश्वासहर्तेला सुरुंग लावणारी आहे. आंतरराष्ट्रीय राजकारण, आंतरराष्ट्रीय संबध, देशांतर्गत परिस्थिती, शेजारी देशाशी असलेले संबध व देशाची संरक्षक विषयक भूमिका या सर्वांच्या विचार करता सगळ्याच गोष्टी जगजाहीर करता येत नसतात. आणि हे आम्हीच केले असे म्हणून उगाच कोणी डांगोराही पिटून सर्जिकल स्ट्राईक बाबत श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये राजकारणी लोकांना राजकारण करायला फक्त मुद्दा हवा असतो, मग ते नेते सत्ताधारी पक्षातले असोत की विरोधक. भारताची एकता अबाधित राखण्यासाठी अशा राष्ट्रीय मुद्द्याविषयी एकमेकांवर चिखलफेक केल्यापेक्षा सर्वांनी ह्या मुद्द्यावर न बोलणेच योग्य ठरेल..! बाकी राहिला मुद्दा जनतेच्या हिताचा, तर त्यासाठी शेतकरी आत्महत्या, दारिद्र्य निर्मुलन, पाणी टंचाई, वाढती लोकसंख्या, बेरोजगारी ह्या मुद्द्यावर देखील बोला ना, पण मात्र अशा राष्ट्रीय मुद्द्यावर बोलून ‘आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी’ असे वागणे म्हणजे खरी गरज आहे ती तुमच्या असल्या शंकेखोर विचार करण्याच्या प्रवृतीचे सर्जिकल करण्याचे..!.