Wednesday 1 June 2016

सैराट, झिंग आणि आपण

एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून सैराट चित्रपटाची चर्चा होत आहे. अस काय आहे की सर्वजण फक्त सैराटमय झालेत, वास्तविक पाहता सैराट ही एक उबळ आहे ती येणार आणि जाणार पण यातून आपल्या समाजाची मानसिकता लक्षात आली हे मात्र नक्की. नागराज मंजुळे यांनी फेंड्रीद्वारे समाज व्यवस्थेवर भिरकवलेला दगड सैराटद्वारे थेट डोस्क्यातच घातला आहे तरी पण प्रश्न उरतो तो समाजाच्या बधीरतेचा, समाज व्यवस्थेचा. ग्रामीण भागातील किशोर वयीन युगुलाच्या प्रेम कहाणीवर आधारित असलेल्या या चित्रपटाद्वारे समाजातील अगदी गंभीर विषयावर हात घालण्याचे धाडस नागराज मंजुळे यांनी केले प्रेक्षकांनी त्यातून चांगले घेणे अपेक्षित होते पण वाईट प्रवृत्तीकडेच समाजाची ओढ जास्त असते हे मात्र नक्की. मागील काही दिवसामध्ये वर्तमान पत्रामध्ये तरुण आणि तरुणी पळून गेल्याच्या बातम्या वाचल्या आणि सैराट चित्रपटातील शेवट बघून जेवढे मनन सुन्न झाले नाही त्यापेक्षा जास्त मन सुन्न झाले ते या वृत्तामुळे. समजातील जातीधार्मापेक्षा प्रेम हे श्रेष्ठ आहे त्यामुळे जातीभेद न करता ते समाजाने स्वीकारावे हा उद्देश सैराट चित्रपटाचा असू शकतो पण आई बापांची पर्वा न करता पळून जाणे हा कदापि असू शकत नाही. वास्तविक जीवन आणि चित्रपट यामध्ये बरेच अंतर असते हे तरुणांनी लक्षात घ्यायला हवे. मागील काही दिवसामध्ये मुन्नी, शीला, शांताबाई या नावाच्या महिलांना खूप मानसिक त्रास सोसावा लागला आणि आता अर्ची अर्थात अर्चना नावांच्या महिलांना, मुलीनाही त्याच मार्गाने जावे लागत आहे. चित्रपटातून घ्यायचेच असेल तर सकारात्मक घ्यावे अन्यथा चित्रपट बहितल्यानंतर तो डोक्यात न घेता चित्रपट गृहातच सोडलेला केंव्हाही बरा.

No comments:

Post a Comment