Thursday 30 June 2016

व्यवसायासाठी सकारात्मक दृष्टीकोन हवा..!

माहिती तंत्रज्ञानाच्या कक्षा रुंदावल्यामुळे जग झपाट्याने बदलत आहे, आणि रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण होत आहेत. माहिती तंत्रज्ञानाच्या या जगात अगदी कल्पना सुद्धा विकली जाऊ शकते, फक्त त्यासाठी तुम्हाला तुमच्यातील क्षमता ओळखता आली पाहिजे. इतक्या मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या म्हणा किंवा व्यवसायाच्या म्हणा संधी निर्माण होत असतांना प्रत्येकजण नोकरी शोधतांना दिसतो आहे. शिक्षण हे केवळ नोकरीसाठीच मर्यादित न ठेवता आपली आणि आपल्या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्याचा उपयोग करण्याची जबाबदारी ही तरुणांची आहे.ग्रामीण भागामध्ये सुद्धा बदल होत आहेत इंटरनेटच्या कनेक्टीव्हिटी मुळे ग्रामीण भागातील तरुणांसाठी सुद्धा व्यावसायिकतेचे दरवाजे खुले झाले आहेत. इतके असूनही व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन बऱ्याच अंशी बदलत नाही ही खेदाचीच बाब म्हणावे लागेल. ग्रामीण भागामध्ये सुद्धा रोजगाराच्या चांगल्या संधी आहेत फक्त गरज आहे ती दुर्दम्य इच्छा शक्तीची आणि दृष्टीकोन बदलण्याची. दुग्ध व्यवसाय, दुग्ध प्रक्रिया उद्योग, शेळीपालन, कुक्कुटपालन, असे कितीतरी व्यवसाय करण्यासाठी पर्याय उपलब्ध असतांना केवळ नोकरी करायची या हट्टापायी आपण आपल्यातील सुप्त शक्ती आणि वेळ दोन्ही वाया घालत आहोत. एका थोर विचारवंताने म्हटले आहे की शाळेत शिकविलेले सगळे विसरल्या नंतर जे उरते ते शिक्षण होय”, शिक्षण हे केवळ ठराविक तत्त्वासांठी नसून जीवनाच्या सार्वंगीक विकासासाठी असते. ग्रामीण भागातील तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात शहरांकडे कामासाठी गर्दी करतांना दिसतोय. याच कठीण प्रसंगात माणसाच्या कर्तुत्वाचा कस लागत असतो. मळलेल्या वाटेवर गर्दी फार कमी असतेग्रामीण भागातील तरुणांनी चौकटी बाहेरचा विचार करून आपल्या गावात किंवा गावालगत एखादा व्यवसाय सुरु केल्यास गावातील इतर तरुणांना सुद्धा रोजगार मिळेल आणि ज्या गावातसमाजात आपण राहतो त्याचेही काही देणे लागतेच ते पूर्ण झाल्याचे समाधान मिळेल ते वेगळेच..!

No comments:

Post a Comment