रिओ ऑलिम्पिकसाठी
गेलेल्या भारतीय ११७ खेळाडूच्या चमूने फक्त दोन पदके प्राप्त केलीत ही गोष्ट
नक्कीच विचार करण्याजोगी आहे. याला करणाच आपली व्यवस्था आहे. लहानपणापासूनच जर
मुलांना शालेय शिक्षणाबरोबरीने खेळण्यास वाव दिला तर आपसूकच आत्ताचे हे चित्र
वेगळे दिसेल यात शंका नाही. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय शिक्षणापासूनच
त्याची तयारी करून घ्यायला हवी, त्यासाठी प्रत्येक शाळेत विविध खेळांचे अद्यावत
प्रशिक्षण व प्रशिक्षक असणे अत्यंत आवश्यक आहे. आज प्रत्येक जन शाळेत जातो तो
डॉक्टर, इंजिनीअर, वकील होण्यासाठी, खेळांकडे पाहण्याचा तरुणांचा दृष्टीकोनच
नकारत्मक आहे. हा दृष्टिकोन बदलायला हवा विशेषतः ग्रामीण भागातील शाळेत तर अनेक
विध्यार्थी असे असतात कि त्यांच्यामध्ये अचाट क्रीडा कौशल्य असतात आणि त्यांच्या
ह्या गुणाला शिक्षक हेरतात पण अपुऱ्या क्रीडा सोईसुविधामुळे विध्यार्थ्यांचे हे
कलागुण तिथेच लोप पावतात. त्यामुळे शासकीय पातळीवरून शहरासाहित ग्रामीण भागातही
क्रीडा सुविधा उपलब्ध झाल्यास टोकियो २०२० च्या ऑलिम्पिकमध्ये नक्कीच यापेक्षा
निराळे चित्र बघण्यास मिळेल अशी अशा करूयात...!
No comments:
Post a Comment