Thursday 30 June 2016

व्यवसायासाठी सकारात्मक दृष्टीकोन हवा..!

माहिती तंत्रज्ञानाच्या कक्षा रुंदावल्यामुळे जग झपाट्याने बदलत आहे, आणि रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण होत आहेत. माहिती तंत्रज्ञानाच्या या जगात अगदी कल्पना सुद्धा विकली जाऊ शकते, फक्त त्यासाठी तुम्हाला तुमच्यातील क्षमता ओळखता आली पाहिजे. इतक्या मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या म्हणा किंवा व्यवसायाच्या म्हणा संधी निर्माण होत असतांना प्रत्येकजण नोकरी शोधतांना दिसतो आहे. शिक्षण हे केवळ नोकरीसाठीच मर्यादित न ठेवता आपली आणि आपल्या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्याचा उपयोग करण्याची जबाबदारी ही तरुणांची आहे.ग्रामीण भागामध्ये सुद्धा बदल होत आहेत इंटरनेटच्या कनेक्टीव्हिटी मुळे ग्रामीण भागातील तरुणांसाठी सुद्धा व्यावसायिकतेचे दरवाजे खुले झाले आहेत. इतके असूनही व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन बऱ्याच अंशी बदलत नाही ही खेदाचीच बाब म्हणावे लागेल. ग्रामीण भागामध्ये सुद्धा रोजगाराच्या चांगल्या संधी आहेत फक्त गरज आहे ती दुर्दम्य इच्छा शक्तीची आणि दृष्टीकोन बदलण्याची. दुग्ध व्यवसाय, दुग्ध प्रक्रिया उद्योग, शेळीपालन, कुक्कुटपालन, असे कितीतरी व्यवसाय करण्यासाठी पर्याय उपलब्ध असतांना केवळ नोकरी करायची या हट्टापायी आपण आपल्यातील सुप्त शक्ती आणि वेळ दोन्ही वाया घालत आहोत. एका थोर विचारवंताने म्हटले आहे की शाळेत शिकविलेले सगळे विसरल्या नंतर जे उरते ते शिक्षण होय”, शिक्षण हे केवळ ठराविक तत्त्वासांठी नसून जीवनाच्या सार्वंगीक विकासासाठी असते. ग्रामीण भागातील तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात शहरांकडे कामासाठी गर्दी करतांना दिसतोय. याच कठीण प्रसंगात माणसाच्या कर्तुत्वाचा कस लागत असतो. मळलेल्या वाटेवर गर्दी फार कमी असतेग्रामीण भागातील तरुणांनी चौकटी बाहेरचा विचार करून आपल्या गावात किंवा गावालगत एखादा व्यवसाय सुरु केल्यास गावातील इतर तरुणांना सुद्धा रोजगार मिळेल आणि ज्या गावातसमाजात आपण राहतो त्याचेही काही देणे लागतेच ते पूर्ण झाल्याचे समाधान मिळेल ते वेगळेच..!

Wednesday 15 June 2016

शेती मशागतीची कामे अंतिम टप्प्यात.

भोकरदन तालुक्यातील कोळेगाव व कोळेगाव परिसरातील शेतीची कामे आटोक्यात आली असून आता शेतकऱ्यांना फक्त पावसाची प्रतीक्षा आहे. पूर्व मोसमी पडलेल्या पावसामुळे काही शेतकऱ्यांनी कपाशीची व इतर पिकांची पेरणी केली असून सदरील पिक धोक्यात आले आहे. यावर्षी पाऊस चांगला होणार या आशेने शेतकऱ्यांनी उधार उसनेवारी करून खत- बि-बियाणे उधारीने घेतले असून पुन्हा एकदा नव्या जोमाने शेतीच्या कामास सुरुवात केली आहे. मृग संपत आला तरी पावसाचे काही आगमन होत नसल्याने यावर्षी सुद्धा बेभरवशाचा पाऊस हुलकावणी देतो की काय यामुळे शेतकऱ्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत आहे.

Thursday 2 June 2016

Ministry of Water resources

2 June 2016
There is job vacancy at Ministry of Water Resources department. for more Information about this advertise like post, age, qualification last date of submission kindly read the Advertisement which is published in Daily Marathi Newspaper Deshonnati on 2 June 2016.  address The superintending engineer hydro logical observation circle central water commission Mahanandi Bhavan (ground floor) A - 13 and 14 Bhoi Nagar Bhuvaneshwar  - Odisha. Best of luck for your job search on behalf of us..

Wednesday 1 June 2016

सैराट, झिंग आणि आपण

एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून सैराट चित्रपटाची चर्चा होत आहे. अस काय आहे की सर्वजण फक्त सैराटमय झालेत, वास्तविक पाहता सैराट ही एक उबळ आहे ती येणार आणि जाणार पण यातून आपल्या समाजाची मानसिकता लक्षात आली हे मात्र नक्की. नागराज मंजुळे यांनी फेंड्रीद्वारे समाज व्यवस्थेवर भिरकवलेला दगड सैराटद्वारे थेट डोस्क्यातच घातला आहे तरी पण प्रश्न उरतो तो समाजाच्या बधीरतेचा, समाज व्यवस्थेचा. ग्रामीण भागातील किशोर वयीन युगुलाच्या प्रेम कहाणीवर आधारित असलेल्या या चित्रपटाद्वारे समाजातील अगदी गंभीर विषयावर हात घालण्याचे धाडस नागराज मंजुळे यांनी केले प्रेक्षकांनी त्यातून चांगले घेणे अपेक्षित होते पण वाईट प्रवृत्तीकडेच समाजाची ओढ जास्त असते हे मात्र नक्की. मागील काही दिवसामध्ये वर्तमान पत्रामध्ये तरुण आणि तरुणी पळून गेल्याच्या बातम्या वाचल्या आणि सैराट चित्रपटातील शेवट बघून जेवढे मनन सुन्न झाले नाही त्यापेक्षा जास्त मन सुन्न झाले ते या वृत्तामुळे. समजातील जातीधार्मापेक्षा प्रेम हे श्रेष्ठ आहे त्यामुळे जातीभेद न करता ते समाजाने स्वीकारावे हा उद्देश सैराट चित्रपटाचा असू शकतो पण आई बापांची पर्वा न करता पळून जाणे हा कदापि असू शकत नाही. वास्तविक जीवन आणि चित्रपट यामध्ये बरेच अंतर असते हे तरुणांनी लक्षात घ्यायला हवे. मागील काही दिवसामध्ये मुन्नी, शीला, शांताबाई या नावाच्या महिलांना खूप मानसिक त्रास सोसावा लागला आणि आता अर्ची अर्थात अर्चना नावांच्या महिलांना, मुलीनाही त्याच मार्गाने जावे लागत आहे. चित्रपटातून घ्यायचेच असेल तर सकारात्मक घ्यावे अन्यथा चित्रपट बहितल्यानंतर तो डोक्यात न घेता चित्रपट गृहातच सोडलेला केंव्हाही बरा.