Wednesday 13 July 2016

मुलांवर अपेक्षांचे ओझे लादू नका.


नुकत्याच बाळापुर येथील घडलेल्या घटनेमुळे मन अगदी सुन्न झाले. केवळ उजळणीचा एक पाढा बिनचूक न म्हणता आल्यामुळे एका ६ वर्षाच्या निरागस चिमकुलीस आपला जीव गमवावा लागला. आपल्या समाजाची मानसिकताच पार ढेपाळलली आहे. जितका समाज सुशिक्षित होत चालला आहे किंबहुना त्याहीपेक्षा क्रूरतेचा कळस गाठत आहे असे म्हणण्यास हरकत नाही, आणि याला कारणीभूत आहे ती आजची स्पर्धात्मक जीवघेणी शिक्षण पद्धती. मुलांपेक्षा पालकांच्याच अपेक्षा पूर्ण करण्याचाच जास्त ताण मुलांवर असतो, शेजारील अमुक एक विद्यार्थ्याने बघ तुज्यापेक्षा जास्त गुण मिळवले, तुझ्या मित्राने अमुक एका स्पर्धेत बक्षीस मिळवले, आणि तू मात्र ढिम्मच अशा आशयाची सतत टोमणी मुलांना दिल्यामुळे ते सतत नैराश्येमध्ये वावरत असतात आणि मग आई वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास असमर्थ झाल्यामुळे टोकाचे पाऊल उचलतात. याला सर्वस्वी आपण जबाबदार आहोत. मुलांना हे कर ते कर अशा उपदेश देण्याआगोदर याच वयात असतांना आपण किती आपल्या आईवडिलांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो याचे विश्लेषण करावे. पालकांनी आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर न लाधता आजच्या त्यांची मानसिकता आणि कल ओळखून त्यांना हवे त्या क्षेत्रामध्ये करिअर करण्यास संधी द्यावी.


No comments:

Post a Comment