Tuesday 19 July 2016

समाज मनपरिवर्तनाची आवशक्यता.


कोपर्डी अत्याचाराचा कराल तेवढा निषेध कमीच आहे. दिल्लीतील निर्भया प्रकरणामुळे कायद्यामध्ये बदल करून देखील अशा घटना घडत असेल तर ही अगदी लाजिरवाणी बाब आहे. कितीही कायदा केला, आंदोलने केली तरी अशा घटना थांबणे शक्य नाही हेच कोपर्डी येथील घटनेतून अधोरेखित झाले आहे. असली घटना परत घडू नये यासाठी कडक कायदा तयार करून तो काटेकोर पणे अमलात आणण्याची आवश्यकता आहे. तरुण वर्गावर चित्रपटांचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव असल्यामुळे अशा घटना घडण्यामागे बऱ्याच अंशी चित्रपट जबाबदार असू शकतात. बलात्कारासारख्या गुन्ह्यामध्ये आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यात जात धर्म किंवा पंथ हा निकष असता कामा नये. राज्याची सुरक्षितता ही सरकारची मुलभूत जबाबदारी आहे त्यामुळे आरोपींना कडक शिक्षा व्हावी हीच जनतेची अपेक्षा असेल हे नक्की..

No comments:

Post a Comment