Wednesday 31 August 2016

कोळेगाव येथे पोळा उत्साहात साजरा


भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे पोळा सण शांततेत साजरा करण्यात आला. सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी बळीराजाच्या सणासाठी कुठलीही कमी भासू दिली नाही. दुपारी अंदाजे पाच वाजे दरम्यान गावाच्या वेशीजवळ वाड्या वस्त्यावरील सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या बैलांना सजवून शांततेत उभे केले. दरम्यान पोळा फुटताच वरून राजाने जोरदार हजेरी लावल्यामुळे गाववासीयांच्या आनंदला पारावर उरला नाही. गावातील युवकांनी पोळ्याचे व्यवस्थित व्यवस्थापन करून पारंपारिक पद्धतीने गावातून बैलांची मिरवणूक काढली. पोळ्याच्या दुसऱ्या दिवसी श्री भैरवनाथ महाराज मंदिराच्या परिसरामध्ये पाडव्यानिम्मित पंचक्रोशीतील शेतकरी आपापल्या बैलांसहित मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात, याही कार्यक्रमासाठी गावकऱ्यांच्या वतीने व्यवस्था केल्यामुळे पाडव्याच्या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Saturday 27 August 2016

Turn toward business.


Day by day the numbers of unemployed youth are increasing. Everyone wants to get five figure job and hence the competition of education is getting so stressful. If job dosen’t get then youth should have to turn to business. Lot of opportunities are waiting for you. Many student who belongs from rural villages goes to city, joined private classes, working hard even they failed to get job and in this situation they commit suicide. Students or youth have to understand that only get a job is not a main aim of education. If you fail to get job no problems try to do different. Today lot of business opportunities available if you start small scale business then some youth also have get job from you, dairy milk, goat farming, chickens farming, milk processing business may option have there. These business ideas not only make you survey in village but also may make you millionaire if you are dedicated to your work, you have done for something for your native place this valuable satisfaction will make you more courage. 

Tuesday 23 August 2016

आता लक्ष्य टोकियो ऑलिम्पिक २०२०

रिओ ऑलिम्पिकसाठी गेलेल्या भारतीय ११७ खेळाडूच्या चमूने फक्त दोन पदके प्राप्त केलीत ही गोष्ट नक्कीच विचार करण्याजोगी आहे. याला करणाच आपली व्यवस्था आहे. लहानपणापासूनच जर मुलांना शालेय शिक्षणाबरोबरीने खेळण्यास वाव दिला तर आपसूकच आत्ताचे हे चित्र वेगळे दिसेल यात शंका नाही. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय शिक्षणापासूनच त्याची तयारी करून घ्यायला हवी, त्यासाठी प्रत्येक शाळेत विविध खेळांचे अद्यावत प्रशिक्षण व प्रशिक्षक असणे अत्यंत आवश्यक आहे. आज प्रत्येक जन शाळेत जातो तो डॉक्टर, इंजिनीअर, वकील होण्यासाठी, खेळांकडे पाहण्याचा तरुणांचा दृष्टीकोनच नकारत्मक आहे. हा दृष्टिकोन बदलायला हवा विशेषतः ग्रामीण भागातील शाळेत तर अनेक विध्यार्थी असे असतात कि त्यांच्यामध्ये अचाट क्रीडा कौशल्य असतात आणि त्यांच्या ह्या गुणाला शिक्षक हेरतात पण अपुऱ्या क्रीडा सोईसुविधामुळे विध्यार्थ्यांचे हे कलागुण तिथेच लोप पावतात. त्यामुळे शासकीय पातळीवरून शहरासाहित ग्रामीण भागातही क्रीडा सुविधा उपलब्ध झाल्यास टोकियो २०२० च्या ऑलिम्पिकमध्ये नक्कीच यापेक्षा निराळे चित्र बघण्यास मिळेल अशी अशा करूयात...!

Tuesday 9 August 2016

खेड्यांचा सर्वांगीण विकास व्हावा..

शहराचा आणि गावाचा समतोल राखण्यासाठी खेड्यांचा विकास होणे अत्यन्त आवश्यक आहे. शासनाने रोजगाराभिमुख योजना राबवून खेडेगावातील तरुणांना प्रशिक्षित केले तर रोजगारासाठी शहरात होणारी गर्दी कमी होण्यास मदत होईल. दिवसेंदिवस कामानिमित्त ग्रामीण भागातील तरुण वर्ग शहराकडे वळतो आहे. वास्तविक पाहता कोणत्याही व्यक्तीला आपला गाव किंवा राष्ट्र आपणहून सोडावे लागत नाही केवळ परिस्थितीमुळे त्यांना हे करावे लागते. त्यामुळे गावातच रोजगाराची व्यवस्था उपलब्ध झाल्यास गाव तर प्रगत होईलच पण दिवसेंदिवस शहरात वाढत चाललेल्या गर्दीला आळा घालणे शक्य होईल. महात्मा गांधीने फार पूर्वीच म्हटले होते कि खेड्याकडे चला, पण आता पर्यंत तरी म्हणावा हा विषय सरकार ने गांभीर्याने घेतलेला दिसत नाही. आता अगदी खरोखरच गरज अशे ती खेड्याकडे वळण्याची. गावपातळीवर विविध शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना असतात. पण केवळ माहिती नसल्याने ग्रामीण भागातील तरुण शेतकरी वर्ग यापासून वंचित राहतो आणि माहिती असलीही तरी साहेबांचा खिसा गरम केल्याशिवाय काम होण्याची तसु भरही शक्यता नसते हि परिस्थिती बदलायला हवी. बेरोजगरीमुळे एकीकडे खेडी ओस पडताहेत तर शहरे अवाढव्य विस्तारत आहेत, त्यामुळे भविष्यात निर्माण होणारा हा धोका लक्षात घेऊन वेळीच उपाय योजना करायला हवी. ग्रामीण भागातील तरुणांना गावातच प्रशिक्षण देऊन शेतीपूरक व्यवसायाचे प्रशिक्षण त्यासाठी लागणारे भाग भांडवलाची व्यवस्था केल्यास, गावमध्येच रोजगार निर्माण होईल परिणामी इतर तरूणांना हि त्यासोबत रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल. तरुणांनी देखील केवळ नोकरीसाठी शिकता व्यवसायाभिमुख शिक्षणाची कास धरल्यास झपाट्याने फुगणारी शहरे आणि एकीकडे ओस पडणारी खेडी यांचा सुवर्णमध्य निघू शकेल अशी आशा करूयात.