सिल्लोड येथे दिनांक २९
जुलै रोजी केंद्रीय दळणवळण व भूपृष्ठ्मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते औरंगाबाद-
जळगाव रस्त्याच्या सिमेंटीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी गडकरी साहेब
म्हणाले की सदरील रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दानवे साहेबांच्या हातात कात्री
तर सत्तार साहेबांच्या हातात रिबीन असेल. किती क्रांतीकारी विचार आहेत हे. शेजारचा
चीन डुरक्या फोडतोय तर पाकिस्तान वाकुल्या दाखवतोय अशा परिस्थितीमध्ये देशामध्ये
राजकीय पातळीवरून एकात्मतेचे प्रदर्शन होणे आवश्यक आहे. कारण कार्यकर्त्यांवर
किंबहुना जनतेवर आपले लोकप्रतिनिधी कसे वागतात ह्याचा खूप मोठा परिणाम होत असतो
त्यामुळे विकास कामामध्ये खरोखरच जर राजकारणाला दूर ठेवले तर डॉ.ए.पी.जे अब्दुल
कलाम यांचे २०२० पर्यंत भारत महासत्ता होण्याचे स्वप्न पूर्ण झालेच म्हणून समजा. इंग्रजांनी
हेच केले होते फोडा आणि राज्य करा आणि पुन्हा सर्वाना एकत्र होण्यासाठी
कित्येकांचे बळी गेले कित्येक दिवस वाट बघावी लागली आणि नंतर स्वातंत्र्य मिळाले
त्यामुळे मिळालेले हे स्वातंत्र्य असेच अबाधित ठेवण्यासाठी किंबहुना देशाची प्रगती
करण्यासाठी आज सर्व राजकीय नेत्यांनी किमान विकास कार्यामध्ये तरी राजकीय जोडे
बाहेर ठेवून सकारात्मकता ठेवून सहकार्य करण्याची अपेक्षा आहेत. तरच खऱ्या अर्थाने
विकास कामांची रिबीन आपण समतेच्या कात्रीने कापू शकू यात तिळमात्र शंका नाही.
Sunday, 30 July 2017
Wednesday, 21 June 2017
CM Devendra Fadnvis answered my question.
The program Mi Mukhyamantri Boltoy was organized on behalf
of Directorate General of Information and Public Relations (DGIPR). Department also appealed for send question to public regarding subject. The subject was WATER for agriculture, business. As per the news of Daily Pudhari (which was published from Mumbil) More than
18000 emails were received by department regarding this issue. The most attractable and sensetive question was ‘what
is the planning for recover of prodigious dewatering’ which is asked by me and
CM Devendra Fadnvis has given nice answer for this. Kindly watch video till the
end.
कोलेगाव् के किसान ने मुख्यमंत्री से पूछा सवाल
भोकरदन तहसील के कोलेगाव के युवक दादाराव गावंडे ने महाराष्ट्र सरकार द्वारा आयोजित कार्यक्रम "मी मुख्यमंत्री बोलतोय" में पानी के इस्तेमाल के संदर्भ में सवाल पूछा था. इस कार्यक्रम में १८००० से भी ज्यादा लोगो ने इमेल के जरिये मुख्यमंत्री को सवाल किए थे इनमे से दादाराव गावंडे का सवाल काफी परिणाम करक था, मुख्यमंत्री ने उनका अभिनंदन किया और सवाल के जवाब देते हुए कहा की जलयुक्त शिवार योजना के तहत किए जा रहे काम के जगह जलपरिपूर्णता अहवाल सादर करने के लिए जानेवाले धोरण निश्चित किया गया है| सूक्ष्मसिंचन तरीके का उपयोग और गाव द्वारा किये गये जल संतुलन के अनुसार किसनो द्वारा फ़सल का नियोजन जरुरी है| जलयुक्त शिवार योजनामें से किए जलस्वयंपूर्ण हुए गावोमें इस दृष्टीसे नियोजन किया जाएगा| ऐसा मुख्यमंत्री ने कहा|
जलयुक्तच्या पाणी उपश्याकडे गावंडेनी वेधले मुख्यमंत्र्यांचे लक्ष.
Guest Author - Bhagwan Palkar ( Reporter daily Deshonnati Marathi newspaper)
भोकरदन तालुक्यातील कोळेगाव या छोट्याशा गावातील दादाराव गावंडेनी
विचारलेल्या प्रश्नाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून याबद्दल
त्यांचे कौतुक केले आहे.
दादाराव गावंडे हे गावाच्या बाबतीत संवेदनशील
व्यक्तिमत्व. गावाचा विकास व्हावा यासाठी सतत झटत असतात सोशल मिडीयावर सतत कार्यरत
असतात. त्यांचा स्वतःचा ब्लॉग असून युट्यूबवर आहेत. मी मुख्यमंत्री बोलतोय या
कार्यक्रमासाठी जनतेकडून प्रश्न विचारण्याचे आवाहन करण्यात आले होते. नुकत्याच पार
पडलेल्या कार्यक्रमाचा पाणी हा विषय होता. राज्यातून अठरा हजार इमेल प्राप्त झाले
होते. गावामध्ये झालेल्या जलयुक्त शिवारमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले होते.
विहिरी नाले तुडुंब भरले त्यामुळे कपाशी अठरा क्विंटलवरून पंचवीस तर गहू वीस क्विंटलवरून
अठ्ठावीस गेल्याचा अनुभव त्यांनी सांगितला.
पाणी मोठ्या प्रमाणात असले तरी उपसा त्याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात होत असल्याने
लगेच पाण्याचा तुटवडा निर्माण झाला, यावर शासन काय उपाय योजना करणार असा प्रश्न
त्यांनी विचारला होता. यावर मुख्यमंत्र्यांनी चांगला प्रश्न विचारल्याबद्दल
त्यांचे अभिनंदनकरून पिक आराखड्याबद्दल व पाणी ताळेबंदाविषयीचा निर्णय शासन दोन
तीन वर्षात लागू करणार असल्याचे सांगितले.
खेडेगावातील युवकाने सोशल मिडीयाचा योग्य वापर
करून मुख्यमंत्र्यांचे लक्ष जलयुक्त शिवार योजनेचे काम झाल्यानंतर जमा होणाऱ्या
पाण्याच्या जलद उपश्याच्या प्रश्नाकडे वेधल्याने मुंबईच्या वर्तमानपत्रांनी याची
दखल आवर्जून घेतली आहे. अनेकांनी फोन करून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला
आहे.सोशल मिडिया ही केवळ शहरवासीयांची मक्तेदारी नसून ग्रामीण युवकही सकारात्मकतेने
आपले प्रश्न मांडून कल्पकता दाखवितात हे त्या निमित्ताने समोर आले आहे, यामुळे
दादाराव गावंडे यांचे तालुक्यात कौतुक होत आहे.
Tuesday, 16 May 2017
इथे ‘आत्महत्येस’ही लाईक मिळतात.
‘ढोलताशे’ या मराठी चित्रपटाचे निर्माते अतुल
तपकीर यांनी चित्रपटाचे अपयश आणि कौटुंबिक संघर्षामुळे आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी
तपकीर यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर याविषयी सविस्तर माहिती दिली. आश्चऱ्याची गोष्ट
म्हणजे ‘आणि म्हणून मी विष घेऊन आत्महत्या करत आहे’ या त्याच्या फेसबुक पोस्ट ला अनेक
मित्रांचे ‘लाईक्स’ सुद्धा मिळाले आहेत. केवढी मोठी ही शोकांतिका! यावरून आभाशी जग
खरोखर किती आभाशी आहे याची जाणीव होते. आपल्या खऱ्याखुऱ्या नात्यांना प्रसंगी
तिलांजली देऊन आभाशी दुनियाच खरी दुनिया आहे असा अनेकांचा भ्रम होत आहे. प्रत्येक
जण संध्या फेसबुक, व्हाट्सअॅप ट्विटर अशा सामाजिक माध्यमांचा वापर अगदी डोळेझाक करत आहे म्हटल्यास वावगे
ठरणार नाही. सामाजिक माध्यमावर रोज प्रचंड प्रमाणात माहितीची ढकलाढकली चालू असते
आणि यामध्ये व्हाट्सअॅप वर तर कहरच होत
आहे. कोणतीही माहिती न वाचता ती पुढे ढकलली जाते आहे. राजकीय सुडापोटी उगाच
कुणाच्या फोटोला एडिट करून वेगवेगळ्या ग्रुप्सवर फिरवले जाते आणि अशा प्रकारचा
हलगर्जीपणा एक दिवस आपल्याला धोक्यातही आणू शकतो. सामाजिक माध्यमांवर एखादी चुकीची
पोस्ट करणे जशा गुन्हा आहे तितकाच गुन्हा त्या पोस्ट ला लाईक करणे हा सुद्धा आहे. अतुल
तपकीर यांच्या पोस्ट ला लाईक करणाऱ्यांनी नक्कीच ती वाचली नसेल कारण आत्महत्या
करणाऱ्यांना कुणीच प्रोत्साहित करणार नाही. सामाजिक माध्यमांचा वापर आजच्या काळात
तरी टाळणे अशक्य असला तरी तरुणांनी त्याच्या जास्त आहारी न जाण्यातच शहाणपणा आहे. सोशल
माध्यमे ही जागतिक व्यासपीठ आहेत त्यामुळे तिथे व्यक्त होतांना भान असणे अत्यंत
आवश्यक आहे.
Friday, 20 January 2017
get rewards from Indian government by doing data entry job..
if you have laptop or computer and of course time then you should have to go for it..kindly watch my video for how to earn money
Tuesday, 17 January 2017
Speech About online Banking
i am trying to do help of people as much as possible. i was getting problem for internet banking some days before hence i sincerely want to no one have face to this problem like me.
Subscribe to:
Posts (Atom)