Wednesday 15 June 2016

शेती मशागतीची कामे अंतिम टप्प्यात.

भोकरदन तालुक्यातील कोळेगाव व कोळेगाव परिसरातील शेतीची कामे आटोक्यात आली असून आता शेतकऱ्यांना फक्त पावसाची प्रतीक्षा आहे. पूर्व मोसमी पडलेल्या पावसामुळे काही शेतकऱ्यांनी कपाशीची व इतर पिकांची पेरणी केली असून सदरील पिक धोक्यात आले आहे. यावर्षी पाऊस चांगला होणार या आशेने शेतकऱ्यांनी उधार उसनेवारी करून खत- बि-बियाणे उधारीने घेतले असून पुन्हा एकदा नव्या जोमाने शेतीच्या कामास सुरुवात केली आहे. मृग संपत आला तरी पावसाचे काही आगमन होत नसल्याने यावर्षी सुद्धा बेभरवशाचा पाऊस हुलकावणी देतो की काय यामुळे शेतकऱ्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत आहे.

Thursday 2 June 2016

Ministry of Water resources

2 June 2016
There is job vacancy at Ministry of Water Resources department. for more Information about this advertise like post, age, qualification last date of submission kindly read the Advertisement which is published in Daily Marathi Newspaper Deshonnati on 2 June 2016.  address The superintending engineer hydro logical observation circle central water commission Mahanandi Bhavan (ground floor) A - 13 and 14 Bhoi Nagar Bhuvaneshwar  - Odisha. Best of luck for your job search on behalf of us..

Wednesday 1 June 2016

सैराट, झिंग आणि आपण

एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून सैराट चित्रपटाची चर्चा होत आहे. अस काय आहे की सर्वजण फक्त सैराटमय झालेत, वास्तविक पाहता सैराट ही एक उबळ आहे ती येणार आणि जाणार पण यातून आपल्या समाजाची मानसिकता लक्षात आली हे मात्र नक्की. नागराज मंजुळे यांनी फेंड्रीद्वारे समाज व्यवस्थेवर भिरकवलेला दगड सैराटद्वारे थेट डोस्क्यातच घातला आहे तरी पण प्रश्न उरतो तो समाजाच्या बधीरतेचा, समाज व्यवस्थेचा. ग्रामीण भागातील किशोर वयीन युगुलाच्या प्रेम कहाणीवर आधारित असलेल्या या चित्रपटाद्वारे समाजातील अगदी गंभीर विषयावर हात घालण्याचे धाडस नागराज मंजुळे यांनी केले प्रेक्षकांनी त्यातून चांगले घेणे अपेक्षित होते पण वाईट प्रवृत्तीकडेच समाजाची ओढ जास्त असते हे मात्र नक्की. मागील काही दिवसामध्ये वर्तमान पत्रामध्ये तरुण आणि तरुणी पळून गेल्याच्या बातम्या वाचल्या आणि सैराट चित्रपटातील शेवट बघून जेवढे मनन सुन्न झाले नाही त्यापेक्षा जास्त मन सुन्न झाले ते या वृत्तामुळे. समजातील जातीधार्मापेक्षा प्रेम हे श्रेष्ठ आहे त्यामुळे जातीभेद न करता ते समाजाने स्वीकारावे हा उद्देश सैराट चित्रपटाचा असू शकतो पण आई बापांची पर्वा न करता पळून जाणे हा कदापि असू शकत नाही. वास्तविक जीवन आणि चित्रपट यामध्ये बरेच अंतर असते हे तरुणांनी लक्षात घ्यायला हवे. मागील काही दिवसामध्ये मुन्नी, शीला, शांताबाई या नावाच्या महिलांना खूप मानसिक त्रास सोसावा लागला आणि आता अर्ची अर्थात अर्चना नावांच्या महिलांना, मुलीनाही त्याच मार्गाने जावे लागत आहे. चित्रपटातून घ्यायचेच असेल तर सकारात्मक घ्यावे अन्यथा चित्रपट बहितल्यानंतर तो डोक्यात न घेता चित्रपट गृहातच सोडलेला केंव्हाही बरा.

Wednesday 25 May 2016

प्रत्यक्ष कृतीतून विकास शक्य.


जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यापासून पासून १८ किमी अंतरावर असलेल्या कोळेगाव ग्रामपंचायतीला पाणी टंचाई हा शब्द कायमचा वळणी पडलेला. निवडणुका आल्या की प्रत्येकजण घोषणा देतात आणि त्या घोषणाच राहतात, ह्या सर्व विचार सरणीनां फाटा दिला आहे तो येथील एका युवकाने. कोळेगाव येथील युवक गजानन गावंडे यांनी २००० लोकसंख्या असलेल्या कोळेगाव वासीयांना मोफत पाणी पुरवठा करून आदर्श निर्माण केला आहे. गावकऱ्याना कायम पाणी टंचाईचा सामना करावा लागतो, पाणी टंचाईवर खारीचा वाटा म्हणून या तरूणाने आपल्या स्वतःच्या विहिरीतील पाणी गावकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले, स्व: खर्चातून स्वतःच्या विहिरीतले पाणी पईप लाईनद्वारे शासकीय विहिरीत सोडले जात असल्यामुळे काही प्रमाणात का होईना कोळेगाव येथील गावकऱ्यांचा चेहऱ्यावर आनंदाच्या छटा उमटल्या हे नक्की. युवकांना योग्य दिशा दिली आणि नेतृत्व केले तर समाज बदलायला काहीच वेळ लागत नाही हाच संदेश गजानन पाटील गांवडे युवकांना देत असून त्याचे सकारात्मक परिमाण युवकांमध्ये निर्माण होत आहे. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपणाला काही देणे लागते, प्रत्येकांनी कोणतेही सामाजिक कार्य करण्यासाठी स्वतः पासून सुरुवात केली तर समाजात नक्कीच बदल घडू शकतो हे त्यांनी दाखवून दिल्यामुळे गावातील नवतरुण मंडळीमध्ये कमालीचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे, आणि हाच एक टर्निंग पॉइंट गावाच्या विकासाला कारणीभूत ठरू शकेल शंका नाही.

Saturday 21 May 2016

सोशल वालंटिअर्स ग्रुप तर्फे संत रोहिदास महाराजांना अभिवादन.

भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे सोशल वालंटिअर्स ग्रुप तर्फे संत रोहिदास महाराज यांना त्यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या जीवन कार्यवार थोडक्यात प्रकाश टाकण्यात आला. संत रोहिदास महाराजांनी सतत समाजहितासाठी कार्य केले, जातीधार्मापेक्षा समाजधर्म मोठा असतो हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले त्यामुळे युवकांनी त्यांचा आदर्श घेवून सामाजिक उपक्रमामध्ये हिरीरीने सहभाग घेऊन सदैव समाज सेवेसाठी कार्यतत्पर रहावे असे अवाहन सोशल वालंटिअर्स ग्रुपचे सदस्य दादाराव पाटील गावंडे यांनी केले. यावेळी सोशल वालंटिअर्स ग्रुपचे सदस्य दादाराव गावंडे, अवचीतराव सोनवणे, कौतिकराव सोनवणे, अनिल चौतमोल रमेश सोनवणे, कैलास गावंडे, शंकर गावंडे, गणेश सोनवणे, माजी पोलीस पाटील सोनाजी चौतमोल, अरुण गावंडे, रामकृष्णा म्हस्के, विकास शिंदे, राहुल साळवे आदी उपस्थित होते.

आणि मी ‘सगुणाची’ संकल्पनाच बदलली...!

 आजारांची थोडी जरी लक्षण आढळून आली तरी दवाखान्यात नेण्या अगोदर एकदा तरी सपाट भांड्यावर आदला उभा करून ‘सगुण’ पहिल्या शिवाय त्यांना काही चैन पडत नसे. एकदा मी ठरविले की आमच्या आईचा हाच दृष्टीकोन त्यांना जरा वेगळ्या भाषेत समजून सांगूया. असाच एकदा मला ताप असतांना आईने माझा सगुण बघितला. घरातील जेवणाच्या परातीच्या गुळगुळीत पृष्ठ भागावर वेगवेगळ्या देवांची नावे घेवून ती आदला उभा करण्याचा प्रयत्न करीत होती अर्थात गुडी आणण्याचा प्रयत्न करीत होती, आणि एकदाचा तो आदला उभा राहिला आणि तिचा समज झाला की माझ्यावर अमुक एका देवाची अवकृपा झाली आहे. मी तिला सांगितले की मी तुला हाच आदला कोणत्याही देवाचे नाव न घेता उभा करून दाखविला तर?? त्यावर तिच्या सोबतीने घरातील सर्वच मंडळी म्हणाली की हे शक्यच नाही, आणि मग मी घरातील सर्वांना कोणत्याही देवाचे नाव न घेता आदला त्या सपाट परतीच्या गुळगुळीत पृष्ठभागावर उभा करून दाखविला. देवाच्या नावाशिवाय आदला उभा राहूच शकत नाही या घरातील मंडळीच्या फाटा दिला आणि बऱ्याच अंशी त्यांच्या मनातील अंधश्रद्धा दूर केल्याचे मला समाधान लाभले.
श्रद्धा ही सुप्त मनाची एक भावनिक शक्ती आहे, असे म्हणतात की कोणतीही गोष्ट सात वेळेस म्हटल्यावर आठव्या वेळेस प्वाइंट झिरो झिरो का होईना पण त्या गोष्टीचा मनावर परिमाण होतो याला शास्त्रीय आधार आहे. आणि याच गोष्टीचे भांडवल करून ढोंगी साधू बाबा याचा फायदा उठवतात. श्रद्धा डोळस आणि विज्ञानवादी हवी. देवांवर श्रद्धा जरूर असावी त्याने जगण्याला प्रेरणा मिळते अंधश्रद्धा मात्र मुळीच नसावी कोणताही बदल घघडवायला थोडा वेळ आणि साहस लागते. मानवाने यशाची विविध शिखरे पादक्रांत केली असून विज्ञानाच्या जोरावर सर्वच क्षेत्रावर हुकुमत गाजवलेली असतांना अंधश्रद्धेच्या बाबतीत काही प्रमाणात याला अपवाद आहे असेच म्हणावे लागेल. खेड्यातील परिस्थिती एकवेळ आपण समजू शकतो मात्र शहरातील लोकं सुद्धा याला अपवाद नाहीत किंबहुना अंधश्रद्धेच्या बाबतीत खेड्यापेक्षा शहरातील नागरिक जास्त अंधश्रद्धेच्या प्रभावाखाली असल्याचे दिसत आहेत. घरांची वास्तूशांती असो किंवा नवीन दुकानाचे उद्घाटन आजही शुभ दिवस, तिथी पाहून त्याची सुरुवात होते. अंधश्रद्धेची पाळेमुळे लोकांच्या मनात खोलवर रुतलेली असून तिला उपटून काढण्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरांपासून सुरुवात करायला हवी तेंव्हाच समाजात मोठा बदल घडविणे शक्य होईल.