मागील दोन वर्षापासून मिरची ह्या पिकावर रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव असल्यामुळे परिणामी मिरचीने भावाचा नवीन उच्चांक गाठला. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे ह्या वर्षी मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात झाली. आणि जे अपेक्षित होते तेच झाले. चौदा रुपये प्रति किलो विकली गेलेली मिरची आज पाच रुपये प्रती किलो या भावाने विकली जात आहे. व्यापारी वर्गाकडून एक प्रकारे शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. जिवाची तम न बाळगता शेतकरी रात्रंदिन अपार कष्ट करतो तेंव्हा कुठे पीक त्याच्या हाती लागते. पण एवढे करूनही शेतकरी मार खातो ते मार्केटिंगमध्ये, सर्वच बाबतीत सरकार शेतकऱ्यांची मदत करू शकणार नाही. त्यामुळे 'ट्रेंड' बघून शेतकऱ्यांनी आपापल्या पिकांचे नियोजन केल्यास आज मिरचीची जी परिस्थिती आहे त्यासारखी परिस्थिती निर्माण होणार नाही. अर्थ शास्त्राच्या मांगणी आणि पुरवठा हा सिद्धांतही लक्षात घेणे आवश्यक आहे. एखाद्या पिकाला जर चांगला बाजार भाव मिळत असेल तर सर्वांनीच त्याकडे वळणे योग्य ठरणार नाही कारण उत्पादन जास्त झाले कि बाजार भाव आपोआपच कमी होतात. केवळ एकाच पीक न घेता वेगवेगळ्या प्रकारची पिके शेतकऱ्यांनी घेतल्यास जेणे करूनएखाद्या शेत मालास भाव कमी मिळाल्यास दुसऱ्या पिकातून त्याची भरपाई करता येइल. याचप्रमाणे शेतमालाच्या मार्केटिंगचा अभ्यास करून पिकांचे नियोजन केल्यास याचाही शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. सध्यातरी मिरचीने शेतकऱ्यांना ठसका लावला आहे, त्याचा 'हिरवा चिखल' न होवो एवढीच अपेक्षा...!
Sunday, 4 September 2016
Wednesday, 31 August 2016
कोळेगाव येथे पोळा उत्साहात साजरा
भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे पोळा सण शांततेत साजरा करण्यात आला. सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी बळीराजाच्या सणासाठी कुठलीही कमी भासू दिली नाही. दुपारी अंदाजे पाच वाजे दरम्यान गावाच्या वेशीजवळ वाड्या वस्त्यावरील सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या बैलांना सजवून शांततेत उभे केले. दरम्यान पोळा फुटताच वरून राजाने जोरदार हजेरी लावल्यामुळे गाववासीयांच्या आनंदला पारावर उरला नाही. गावातील युवकांनी पोळ्याचे व्यवस्थित व्यवस्थापन करून पारंपारिक पद्धतीने गावातून बैलांची मिरवणूक काढली. पोळ्याच्या दुसऱ्या दिवसी श्री भैरवनाथ महाराज मंदिराच्या परिसरामध्ये पाडव्यानिम्मित पंचक्रोशीतील शेतकरी आपापल्या बैलांसहित मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात, याही कार्यक्रमासाठी गावकऱ्यांच्या वतीने व्यवस्था केल्यामुळे पाडव्याच्या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Saturday, 27 August 2016
Turn toward business.
Day by day the numbers of unemployed youth are
increasing. Everyone wants to get five figure job and hence the competition of
education is getting so stressful. If job dosen’t get then youth should have to
turn to business. Lot of opportunities are waiting for you. Many student who
belongs from rural villages goes to city, joined private classes, working hard
even they failed to get job and in this situation they commit suicide. Students
or youth have to understand that only get a job is not a main aim of education.
If you fail to get job no problems try to do different. Today lot of business
opportunities available if you start small scale business then some youth also
have get job from you, dairy milk, goat farming, chickens farming, milk
processing business may option have there. These business ideas not only make
you survey in village but also may make you millionaire if you are dedicated to
your work, you have done for something for your native place this valuable
satisfaction will make you more courage.
Tuesday, 23 August 2016
आता लक्ष्य टोकियो ऑलिम्पिक २०२०
रिओ ऑलिम्पिकसाठी
गेलेल्या भारतीय ११७ खेळाडूच्या चमूने फक्त दोन पदके प्राप्त केलीत ही गोष्ट
नक्कीच विचार करण्याजोगी आहे. याला करणाच आपली व्यवस्था आहे. लहानपणापासूनच जर
मुलांना शालेय शिक्षणाबरोबरीने खेळण्यास वाव दिला तर आपसूकच आत्ताचे हे चित्र
वेगळे दिसेल यात शंका नाही. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय शिक्षणापासूनच
त्याची तयारी करून घ्यायला हवी, त्यासाठी प्रत्येक शाळेत विविध खेळांचे अद्यावत
प्रशिक्षण व प्रशिक्षक असणे अत्यंत आवश्यक आहे. आज प्रत्येक जन शाळेत जातो तो
डॉक्टर, इंजिनीअर, वकील होण्यासाठी, खेळांकडे पाहण्याचा तरुणांचा दृष्टीकोनच
नकारत्मक आहे. हा दृष्टिकोन बदलायला हवा विशेषतः ग्रामीण भागातील शाळेत तर अनेक
विध्यार्थी असे असतात कि त्यांच्यामध्ये अचाट क्रीडा कौशल्य असतात आणि त्यांच्या
ह्या गुणाला शिक्षक हेरतात पण अपुऱ्या क्रीडा सोईसुविधामुळे विध्यार्थ्यांचे हे
कलागुण तिथेच लोप पावतात. त्यामुळे शासकीय पातळीवरून शहरासाहित ग्रामीण भागातही
क्रीडा सुविधा उपलब्ध झाल्यास टोकियो २०२० च्या ऑलिम्पिकमध्ये नक्कीच यापेक्षा
निराळे चित्र बघण्यास मिळेल अशी अशा करूयात...!
Tuesday, 9 August 2016
खेड्यांचा सर्वांगीण विकास व्हावा..
शहराचा आणि गावाचा समतोल राखण्यासाठी
खेड्यांचा विकास होणे अत्यन्त आवश्यक आहे. शासनाने रोजगाराभिमुख योजना राबवून खेडेगावातील तरुणांना प्रशिक्षित केले तर रोजगारासाठी शहरात होणारी गर्दी कमी होण्यास मदत होईल. दिवसेंदिवस कामानिमित्त
ग्रामीण भागातील तरुण वर्ग शहराकडे वळतो आहे. वास्तविक पाहता कोणत्याही व्यक्तीला आपला गाव किंवा राष्ट्र आपणहून सोडावे लागत नाही केवळ परिस्थितीमुळे
त्यांना हे करावे लागते. त्यामुळे गावातच रोजगाराची व्यवस्था उपलब्ध झाल्यास गाव तर प्रगत होईलच पण दिवसेंदिवस शहरात वाढत चाललेल्या गर्दीला आळा घालणे शक्य होईल. महात्मा गांधीने फार पूर्वीच म्हटले होते कि खेड्याकडे चला, पण आता पर्यंत तरी म्हणावा हा विषय सरकार ने गांभीर्याने घेतलेला दिसत नाही. आता अगदी खरोखरच गरज अशे ती खेड्याकडे वळण्याची. गावपातळीवर विविध शेतकऱ्यांसाठी
शासनाच्या विविध कल्याणकारी
योजना असतात. पण केवळ माहिती नसल्याने ग्रामीण भागातील तरुण शेतकरी वर्ग यापासून वंचित राहतो आणि माहिती असलीही तरी साहेबांचा खिसा गरम केल्याशिवाय
काम होण्याची तसु भरही शक्यता नसते हि परिस्थिती बदलायला हवी. बेरोजगरीमुळे एकीकडे खेडी ओस पडताहेत तर शहरे अवाढव्य विस्तारत आहेत, त्यामुळे भविष्यात निर्माण होणारा हा धोका लक्षात घेऊन वेळीच उपाय योजना करायला हवी. ग्रामीण भागातील तरुणांना गावातच प्रशिक्षण देऊन शेतीपूरक व्यवसायाचे
प्रशिक्षण व त्यासाठी लागणारे भाग भांडवलाची व्यवस्था केल्यास, गावमध्येच रोजगार निर्माण होईल व परिणामी इतर तरूणांना हि त्यासोबत रोजगाराच्या
संधी उपलब्ध होईल. तरुणांनी देखील केवळ नोकरीसाठी न शिकता व्यवसायाभिमुख शिक्षणाची कास धरल्यास झपाट्याने फुगणारी शहरे आणि एकीकडे ओस पडणारी खेडी यांचा सुवर्णमध्य
निघू शकेल अशी आशा करूयात.
Tuesday, 19 July 2016
समाज मनपरिवर्तनाची आवशक्यता.
कोपर्डी अत्याचाराचा कराल
तेवढा निषेध कमीच आहे. दिल्लीतील निर्भया प्रकरणामुळे कायद्यामध्ये बदल करून देखील
अशा घटना घडत असेल तर ही अगदी लाजिरवाणी बाब आहे. कितीही कायदा केला, आंदोलने केली
तरी अशा घटना थांबणे शक्य नाही हेच कोपर्डी येथील घटनेतून अधोरेखित झाले आहे. असली
घटना परत घडू नये यासाठी कडक कायदा तयार करून तो काटेकोर पणे अमलात आणण्याची
आवश्यकता आहे. तरुण वर्गावर चित्रपटांचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव असल्यामुळे अशा घटना
घडण्यामागे बऱ्याच अंशी चित्रपट जबाबदार असू शकतात. बलात्कारासारख्या
गुन्ह्यामध्ये आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यात जात धर्म किंवा पंथ हा
निकष असता कामा नये. राज्याची सुरक्षितता ही सरकारची मुलभूत जबाबदारी आहे त्यामुळे
आरोपींना कडक शिक्षा व्हावी हीच जनतेची अपेक्षा असेल हे नक्की..
Wednesday, 13 July 2016
मुलांवर अपेक्षांचे ओझे लादू नका.
नुकत्याच बाळापुर येथील घडलेल्या
घटनेमुळे मन अगदी सुन्न झाले. केवळ उजळणीचा एक पाढा बिनचूक न म्हणता आल्यामुळे एका
६ वर्षाच्या निरागस चिमकुलीस आपला जीव गमवावा लागला. आपल्या समाजाची मानसिकताच पार
ढेपाळलली आहे. जितका समाज सुशिक्षित होत चालला आहे किंबहुना त्याहीपेक्षा
क्रूरतेचा कळस गाठत आहे असे म्हणण्यास हरकत नाही, आणि याला कारणीभूत आहे ती आजची
स्पर्धात्मक जीवघेणी शिक्षण पद्धती. मुलांपेक्षा पालकांच्याच अपेक्षा पूर्ण
करण्याचाच जास्त ताण मुलांवर असतो, शेजारील अमुक एक विद्यार्थ्याने बघ
तुज्यापेक्षा जास्त गुण मिळवले, तुझ्या मित्राने अमुक एका स्पर्धेत बक्षीस मिळवले,
आणि तू मात्र ढिम्मच अशा आशयाची सतत टोमणी मुलांना दिल्यामुळे ते सतत
नैराश्येमध्ये वावरत असतात आणि मग आई वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास असमर्थ
झाल्यामुळे टोकाचे पाऊल उचलतात. याला सर्वस्वी आपण जबाबदार आहोत. मुलांना हे कर ते
कर अशा उपदेश देण्याआगोदर याच वयात असतांना आपण किती आपल्या आईवडिलांच्या अपेक्षा
पूर्ण करू शकलो याचे विश्लेषण करावे. पालकांनी आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर न
लाधता आजच्या त्यांची मानसिकता आणि कल ओळखून त्यांना हवे त्या क्षेत्रामध्ये करिअर
करण्यास संधी द्यावी.
Subscribe to:
Posts (Atom)